Wednesday 20 April 2011

अजून राधा


यमुनेचे जळ कंप पावते ह्रदय तिचे धडधडते रे
मुके हुंदके कानी पडती अजून राधा रडते रे

कशास रचला रासरंग तू, सूर वेणूचे आळवले
नंदनवन का माझ्यासाठी यमुनातीरावर रचले?
कदंब-शाखेवरची कोकीळ झोपेतच थरथरते रे

मन लोणी मम तन लोणी, नयनामधले द्रव लोणी
तू गेल्यावर लपून आता चोरायाचे ते कोणी 
तू ना येसी, वेडे मन पण तुझीच चाहूल घेते रे

रंग फिके या होळीचे शाम तुझ्या रंगापुढती
नयना मधले काजळ वाहे अश्रू सावळे ओघळती
रंगामध्ये तन भिजते मन भिजण्या आतुरते रे

-स्वानंद 


वेड्या मनात माझ्या तू जागवली होतीस प्रीत
जगावेगळे नाते आपुले जगावेगळी रीत 
एकटी झुरते आता अन सैरभैर मी फिरते रे!

गुंतले हे प्राण तुझ्यात करिते मी शोक 
भिन्न शरीरे असूनही आत्मा मात्र एक
काजळरात्री डोळे मिटूनी श्यामल मूर्ती स्मरते रे!
-आकांक्षा

Inspiration: swanand marulkar
http://amrutsanchay.blogspot.com

No comments:

Post a Comment